Wednesday, 8 September 2021

सापाविषयी जाणून घेवू या.

साप खाल्ला तर माणूस मरतो का ? 

काय घाबरलात ना? पण घाबरू नका! काही वर्षानी का होईना, भारतातही हॉटेलात शिरल्यावर मेनूकार्डात चिकन, मटणाच्या बरोबर सापाचे मांस, कबाब इत्यादी पदार्थ नक्कीच लिहिलेले आढळतील. आजही चिनी उपहारगृहात सापाचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. हळूहळू अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणारच आहे. त्यामुळे मनुष्य साप, उंदीर, बेडूक अशा अनेक प्राण्यांना फस्त करत सुटेल. अर्थात सध्याही जगाच्या काही भागात हे प्राणी खाल्ले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप हा भयंकर विषारी असतो; मग तो खाल्ल्यास मृत्यू येणार नाही का ?
साप खाल्ल्यावर माणूस मरत नाही, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सापाचे विष फक्त त्याच्या दातांजवळील ग्रंथीतच असते. ते सर्व शरीरभर पसरलेले नसते. त्यामुळे साप खाल्ला तरी कोणी मरणार नाही. दुसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सापाचे विष जर खाल्ले तरी काहीही दुष्परिणाम होणार नाही. सापाचे विष म्हणजे एक प्रकारचे प्रथिनच असते. जठरातील आम्ल व इतर विकरांमुळे या प्रथिनांचे पचन होऊन जाईल. कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
साप चावल्यानंतर एकतर हे विष रक्तातून शरीरभर पसरते किंवा स्नायूतून चेतातंतूमध्ये व तेथून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे सर्पविषबाधेची लक्षणे ही प्रामुख्याने रक्ताभिसरण संस्था किंवा मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतात. या दोन्ही कारणांमुळे आपल्या लक्षात येईल की, साप खाल्ला तरी माणूस मरत नाही.

Saturday, 4 September 2021

शिक्षक पुरस्कार

" शिक्षकांचा पुरस्कार"
 
     भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बर्‍याच ठिकाणी शिक्षक पुरस्कारांचे वितरण होते .पुरस्कारासाठी काही शिक्षकांची निवड होते तर काहींची होत नाही .ज्यांची निवड होते ते आनंदी होतात आणि ज्यांची निवड होत नाही ते दुःखी होतात. पण मला असे वाटते की त्यांनी दुखी किंवा हिरमुसले होऊन जाण्याचे काही एक कारण नाही कारण पुरस्कार हे अल्पसंख्येत असतात मग ते सगळ्यांनाच कसे काय मिळू शकतील? आणि आपण काम पुरस्कारासाठी करत नाहीत. खरं तर शिक्षकाने  आपल्या विद्यार्थ्यांची यशस्विता व त्यांच्याशी असलेली बांधिलकी हाच सर्वोत्तम पुरस्कार समजावा .पुरस्काराबद्दल  जय कृष्णमूर्ती भारतीय तत्त्वज्ञ यांचे विचार वाचण्यासारखे आहेत ,त्यांच्या मते" पुरस्कार, सन्मान ही बाह्य प्रेरणा आहे ,खरी गरज आहे ती अंत प्रेरणेची "आणि हे अगदी खरे आहे. बाह्य प्रेरणा प्रत्येक वेळेला टिकाऊ असतेच असे नाही .मात्र अंतकरणात असलेली प्रेरणा सतत कार्यमग्न राहण्यास प्रवृत्त करते. सतत प्रज्वलित राहणाऱ्या या प्रेरणेने समाजपयोगी कल्याणकारी काम केले जातात. काही लोक मुळातच self motivated असतात .त्यांना बाह्यप्रेरणेची गरज नसते .तिचा फारसा उपयोग होत नाही. कारण ते स्वयंप्रेरित असतात .अशा स्वयंप्रेरीकतेची आज गरज आहे. ती सर्व शिक्षकांमध्ये निर्माण व्हायला हवी.
      शिक्षकांनी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती असते ,त्याची विशेष अशी वैशिष्ट्ये असतात ,त्याचे स्वभाव भिन्न असतात ,प्रत्येक मुलाची अध्ययन गती कमी-अधिक असते ,किंबहुना ते आपल्या कलाने व आपल्या स्वतःच्या वेगाने शिकत असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला समजून घेता आले पाहिजे. शाळेच्या वेळेत ते आपल्या समवेत असतात ,आपल्या सोबत असतात .त्या वेळेला केवळ नेमून दिलेला पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमातील धडे वेळापत्रकानुसार शिकवणे एवढेच आपले काम नाही .कारण त्याच काळात विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या सुद्धा घडत असतात, म्हणून त्या वयात प्रत्येक वेळेला त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या  चांगल्या गोष्टींबद्दल त्याचं कौतुक करायला हवं, शाबासकीची थाप देऊन प्रोत्साहन द्यायला हवं.  त्याला त्याच्या प्रगतीसाठी प्रेरित करायला हवे.त्याची चूक झाल्यास न रागवता ,न चिडता त्याला समजून घेत समजवायला हवं .त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची दखल घेतली गेली पाहिजे . इतकंच नाही तर व्यक्तिगत जीवनात सुद्धा विद्यार्थ्याला आलेल्या समस्यांमध्ये मदत केली पाहिजे . तो मागे पडत असेल तर त्याच्या अध्ययनातील चुका  शोधून त्याच्यासाठी वेगळा वेळ देऊन त्याला इतरांच्या बरोबरीला आणायला हवं , अर्थात हे अनेक शिक्षक करत आहेतच, पण ते अधिक जाणीवपूर्वक घडाव म्हणजेच आणखी प्रगती होईल. शाळेतील ज्ञान व कौशल्य फक्त परीक्षेपुरता किंवा चाचण्या पुरताच नव्हे तर प्रत्यक्ष जीवन व्यवहारात उपयोगी पडावीत,असे वाटत असेल तर त्यामध्ये बदलत्या काळाच्या गरजेनुसार अधिक ज्ञानाची भर घालण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणजेच शाळेत नुसतं शिकणं पुरेसं नाही तर कोणतीही गोष्ट कशी शिकावी व त्याची आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घेता येईल , याचेही शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
       प्रत्येक शिक्षकाने माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी माझा आणि मी त्यांचा अशी भूमिका ठेवली पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे शिक्षकाचे खरे समाधान दररोज वर्गात प्रवेश करताना आपण हसतमुखाने प्रवेश केला तर वर्गातील सारे चेहरे प्रसन्न रस्त्याने उजळते प्रेमाच्या व्यवहाराचे जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते .विद्यार्थी व शिक्षकांचे नाते घट्ट होत जाते, असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयातील एका कप्प्यात कायम स्मरण स्मरणात राहतात. अभ्यासक्रमातील अध्यापन आपल्या प्रसन्न हास्याने आणि मायेच्या ममतेने जर झाले तर त्याचा वेगळाच अनुभव मिळतो. अंतरीचा दिवा प्रत्येक शिक्षकाने हास्याच्या वातीने आणि प्रेमाच्या ज्योतीने सतत पेटता ठेवला ,तेवत ठेवला तर त्यासारखा दुसरा पुरस्कार शिक्षकासाठी नाही. आपल्या प्रत्येक विद्यार्थी या भारत देशाचा सुजाण नागरिक व्हावा हाच शिक्षकासाठी सर्वोत्तम पुरस्कार आणि तो मिळेलच असा निश्चय शिक्षक दिनी करू या .
         शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट वाचनात आली नेताजी सुभाष चंद्र बोस मॅट्रिकला असताना तोंडी परीक्षेसाठी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला "what is difference between station master and school master"नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी उत्तर दिले, "station master minds trains and schoolmaster trains minds" 
किती कमी शब्दात मोठ्ठे उत्तर नेताजींनी दिलं होतं !शिक्षक खरोखर मन घडवणारा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा मोठा प्रभाव असतो .विद्यार्थ्यांचे मन योग्य पद्धतीने घडवण्यासाठी शिक्षकांनी नेहमी सजग राहायला हवं .मुलांना घडवताना आपणही घडत असतो आणि आपल्या देशाची भावी पिढीही घडत असते. म्हणूनच वर्गात आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चैतन्याच्या झऱ्याला आपल्या मनाच्या आंतरिक जिव्हाळ्याची आणि प्रेमाची गरज आहे ,ते आपल्या अंतरंगात आले की 
        "आनंदाचे डोही, आनंद तरंग"
        श्रीमती मेघा अनिल पाटील.
          उपशिक्षिका
         श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
   मोबाईल नंबर 9665189977

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...